suvichar

आज रात्री करा हा लहान सा उपाय

Updated: सोमवार, 17 जून 2019 (10:43 IST)
 
आता आपण बोलू या त्या एका उपायाबद्दल जे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आपल्या इच्छित परिणामासाठी आपण या प्रकारे पौर्णिमेच्या रात्री हा उपाय करू शकता:
 
सर्वात आधी बोलू या दांपत्य जीवनाबद्दल
दांपत्य जीवनात गोडावा टिकून राहावा अशी इच्छा असणार्‍यांनी हा उपाय पौर्णिमेच्या रात्री करावा. सफल दांपत्य जीवनासाठी नवरा किंवा बायकोने किंवा दोघांनी मिळून हा उपाय केल्यास तर निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील पण आपल्या सोयी प्रमाणे नवरा किंवा बायकोमधून कोणीही हा उपाय करू शकतात. आपल्याला चंद्राला दुधाने अर्घ्य द्यायचे आहे. परंतू दुधात साखर किंवा इतर कोणताही पदार्थ न मिसळता आपल्याला चंद्राला पौर्णिमेच्या रात्री अर्घ्य देणे योग्य ठरेल. अर्घ्य देताना या मंत्राचा जप करावा: ऊँ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: चंद्रमासे नम:
 
आता धन संबंधी समस्या सुटाव्या अशी इच्छा असणार्‍यांसाठी हा उपाय आहे. धनाची कमी भासत असेल, किंवा धन टिकत नसेल तर पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात साखर आणि अख्खे तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे.
अर्घ्य देताना या मंत्राचा जप करावा:  ऊँ ऐं क्लीं सोमाय नम: 
धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करता येईल. याने हळू हळू आर्थिक संकट दूर होईल.
 
आता एक उपाय सर्व मनोकामाना पूर्ण होण्यासाठी. मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी कच्च्या दुधात पूजेत वापरत असलेलं चंदन आणि मध मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना - ऊँ सोम सोमाय नम:
या मंत्राचा जप करावा. याने मनोकामाना निश्चित पूर्ण होईल.
 
तर आपल्याला दुधाने चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे परंतू पूर्ण दुधाने अर्घ्य देणे शक्य नसल्यास आपण त्या शुद्ध पाणी मिसळू शकता. या उपायाने निश्चितच दांपत्य जीवनात सुख, आर्थिक स्थितीत सुधार आणि सर्व मनोकामना पूर्ण होईल. 

सर्व पहा

गुरुपौर्णिमेला गुरुंच्या चरणांना स्पर्श का करतात? यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments