Festival Posters

गायीला स्पर्श केल्याने ग्रह दोष दूर होतात

Updated: शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:54 IST)
 
सर्व धर्मग्रंथांमध्ये गाय ही पूजनीय आणि पवित्र मानली गेली आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवता वास करतात असे मानले जाते. गाय दिसली की पाठीवर हात फिरवावा. गाईच्या संगोपनाने ती प्रसन्न झाली तर आपले अनेक ग्रह दोष दूर होतात.
 
असाध्य रोग देखील दररोज फक्त गाईची काळजी घेतल्याने बरे होतात. हा प्रयोग किमान 12 महिने करणे आवश्यक आहे. कुठेही जाताना वाटेत गाय दिसली तर तिला उजव्या बाजूने जाऊ द्यावे. असे केल्याने गायीची प्रदक्षिणा होते. ज्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते.
 
शास्त्रात सांगण्यात आले आहे की, ज्या घरामध्ये गाय राहते तसेच गाईची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात.
 
गाईच्या सेवेतून किती फायदा होतो, हे श्रीकृष्णाच्या जीवनातून सिद्ध होते. भगवान श्रीकृष्ण गोपाळ झाले, कारण त्यांनी गाईची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि गाईच्या सेवेचे महत्त्व सांगितले. ज्योतिषाचार्यांच्या मते नवग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीची सेवा केलीच पाहिजे, जीवन सुखी होतं.
 
शास्त्रानुसार गायीमध्ये सुरभी नावाची लक्ष्मी वास करते. सुरभीचा अर्थ आहे - अतिशय सुंदर आभा प्रदान करणारी देवी. गाईपासून मिळणारे दूध, शेण, मूत्र, तूप, दही या सर्व गोष्टी जीवनासाठी उपयुक्त आहेत. गाईच्या डोक्यातून वाहणाऱ्या घामाला गोरोचन म्हणतात. गोरोचनमध्ये लक्ष्मीची प्राप्ती करण्याची क्षमता आहे. यामुळेच ज्या घरात गाय ठेवली जाते. त्या घरात 33 कोटी देवता प्रसन्न राहतात. तेथे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष कोणताही उपाय न करता आपोआप दूर होतो.
 
गाईची सेवा केल्याने तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे पुण्य प्राप्त होते. शास्त्रात गाईचा अपमान करणाऱ्याची कठोर निंदा करण्यात आली आहे. गायीचे मांस खाणार्‍यापेक्षा मोठा पापी या जगात कोणीच असू शकत नाही. शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की गाय मारणे हे पाप आहे ज्याचे प्रायश्चित्त नाही. तीर्थक्षेत्री जाऊन किंवा अनेक यज्ञ करून जे पुण्य गोळा केले जाते, ते सर्व पुण्य गायीच्या सेवेनेच प्राप्त होते.
 
गाईशी संबंधित शुभ संकेत
गायीचं दारात येऊन आवाज देणे, दार चाटणे हे सर्व शुभ आहेत. प्रवासाला जाताना गाय दिसणे शुभ असते. घराच्या अंगणात काढलेल्या रांगोळीवर गाईचा पाय ठेवणे खूप शुभ मानले जाते. रोज गाईला अन्नदान केल्याने नवग्रहांना शांती मिळते.
सर्व देवी-देवता गाई मातेत वास करतात.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, सर्व तीर्थक्षेत्रे गाईच्या चरणी वास करतात असे मानले जाते. जो व्यक्ती नियमितपणे गाईच्या पायावर मातीचा तिलक लावतो, त्याला कोणत्याही तीर्थस्थानी जाण्याची गरज नाही, कारण त्याला सर्व फळ एकाच वेळी मिळतात.
गाईच्या शेपटीला फक्त स्पर्श केल्याने मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, असाही पुराणात उल्लेख आहे.
सकाळी उठल्यानंतर नियमितपणे गाय मातेचे दर्शन घेणारा व्यक्ती अकाली मरू शकत नाही, हे महाभारतात मोठ्या प्रमाणाने सांगितले आहे.
 
या मंत्राने गाई मातेला नमन करावे. 
सर्वदेवमये देवी सर्वदेवैर्लंकृते ।
मातरम्माभिषितं सफलं कुरु नंदिनी । 

सर्व पहा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments