Dharma Sangrah

उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिय दिनचर्या

रविवार, 5 मार्च 2023 (22:39 IST)
उन्हाळ्यात पहाटे माठातील पाण्याचे सेवन करावे. फ्रिजचे पाणी पिऊ नये. यानंतर फिरायला जावे, कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा. 
 
काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंध्रे मोकळी होतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.
 
तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच टाळावे तसेच शिळे अन्न, मद्य, मांसाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंचीत चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते.  
 
भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थांत जलतत्त्व भरपूर असते. आमरसही घ्यावा.  
 
रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे,हे लक्षात घ्यावे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वाढत्या प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचत आहे, तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या

Hiccups Relief Tips: वारंवार उचकी का लागते? त्याची कारणे आणि सोपे उपाय जाणून घ्या

योगा डे 2026: ध्यान, सुदर्शन क्रिया, गतिशील ध्यान किंवा पारलौकिक ध्यान म्हणजे काय?

भारतातील एकमेव राज्य जे कधीही ब्रिटिशांचे गुलाम बनले नाही

अकबर-बिरबलची कहाणी : सत्याचा नेहमीच विजय होतो

पुढील लेख
Show comments