Festival Posters

जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय

बुधवार, 13 जून 2018 (10:45 IST)
१) जिथे राहता त्या कॉलनीत
     चार तरी कुटुंब जोडा,
     अहंकार जर असेल तर
     खरंच  लवकर सोडा ।।
 
२) जाणं येणं वाढलं की
     आपोआप प्रेम वाढेल,
      गप्पांच्या मैफिलीत
      दुःखाचा विसर पडेल ।।
 
३) महिन्यातून एखाद्या दिवशी
     अंगत-पंगत केली पाहिजे,
     पक्वान्नाची गरजच नाही 
     पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।
 
४) ठेचा किंवा भुरका केल्यास
     बघायचंच काम नाही,
     मग बघा चार घास
     जास्तीचे जातात का नाही ।।
 
५) सुख असो दुःख असो
     एकमेकांकडे गेलं पाहिजे,
     सगळ्यांच चांगलं होऊ दे 
     असं देवाला म्हटलं पाहिजे ।।
 
६) एखाद्या दिवशी सर्वांनी
     सिनेमा पहावा मिळून,
     रहात जावं सर्वांशी
     नेहमी हसून खेळून ।।
 
७) काही काही सणांना
     आवर्जून एकत्र यावं,
     बैठकीत सतरंजीवर
     गप्पा मारीत बसावं ।।
 
८) नवरा बायको दोन लेकरात
     "दिवाळ सण" असतो का?,
      काहीही खायला दिलं तरी
      माणूस मनातून हसतो का?
 
९) साबण आणि सुगंधी तेलात
     कधीच आनंद नसतो,
     चार पाहुणे आल्यावरच
     आकाश कंदील हासतो
 
१०) सुख वास्तूत कधीच नसतं
        माणसांची ये-जा पाहिजे,
        घराच्या उंबर्ठ्यालाही
        पायांचा स्पर्श पाहिजे ।।
 
११) दोन दिवसासाठी का होईना
       जरूर एकत्र यावं,
       जुने दिवस आठवताना
       पुन्हा लहान व्हावं ।।
 
१२) वर्षातून एखादी दुसरी
       आवर्जून ट्रिप काढावी,
       "त्यांचं आमचं पटत नाही"
       ही ओळ खोडावी ।।
 
१३) आयुष्य खूप छोटं आहे
       लवकर लवकर भेटून घ्या 
       काही धरा काही सोडा
       सगळे वाद मिटवून घ्या
 
       तसेच आपल्या ह्रदयातही साठवा

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

अटारी सीमेवर 'जय हो'चा गजर होणार, ए. आर. रहमान बीएसएफला संगीतमय आदरांजली वाहणार

अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन

''सिंधुदुर्ग'' महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पुढील लेख
Show comments