नवीन व्रत
एक आटपाट नगर होतं तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव,
या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली. बी.पी; शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण...
तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट, आणि What's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काही दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल...
चिकटून बसलेले बी.पी; शुगर वागू लागले फॉर्मल...ती आनंदली, What's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली. तिची एक सखी निर्मळ मनाची! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही. स्त्री म्हणाली बघ, रोज सकाळी उठता क्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GN चा वेळोवेळी जप करावा. यथासमय देवाच्या देव्हार्यात डोकवावे, मनमोकळ करावे. एका ग्रुपने What's app ला वाहिलेले सर्व काही दुस-या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे...
रुसु नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये...त्या सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ..! बी.पी; शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ. तुम्ही ही व्रत हे धरावे, कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ What's app ला पुजावे. जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हास ही पावो...हे व्रत सर्व बंधु व भगिनीने करावे. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....