सुरेश आणि रमेश दोघे फिरायला निघाले होते. चालचा चालता सुरेश एकदम थांबला आणि पलीकडच्या फुटपाथावरून येणार्या एका इसमाकडे पाहात राहिला. 'काय झालं रे सुरेश?' रमेश ने विचारले. 'त्या समोरच्या गृहस्थाला ओळखतोस तू?' सुरेश ने विचारले. 'नाही', रमेश म्हणाला 'त्याने माझे पन्नास हजार रुपयाचं नुकसान केलं आहे,' सुरेख एकदम रागाने म्हणाला. रमेश ने एकदम आश्चर्यवाटून विचारले, 'त्याने तुझे पन्नास हजाराचे नुकसान केलयं?' 'हो' सुरेश म्हणाला. 'ते कसं?' रमेश ने कुतूहलाने विचारले. 'त्याने आपल्या एकुलत्या एका मुलींच लग्न माझ्याशी न करता सरळ दुसर्याबरोबर लवून दिलं,' सुरेश म्हणाला.