'यंदा अरबी समुद्रवर एक सारखे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने इतका पाऊस झाला की, आमची विहीर काठोकाठ भरली. बादलीत तांब्या बुडवावा इतकं सहज आम्ही पाणी काढत होतो.' रामू म्हणाला. यावर दामू लगेच सांगू लागला, 'आमच्या विहीरीलामध्ये इतकं पाणी आलं की, विहीर गच्च भरून वर दहा फूट पाणी गेलं. त्यामुळे आम्हाला शिडीवर चढून पाणी काढावं लागत होतं.