Dharma Sangrah

Kabir Das Jayanti 2020 : संत कबीर दासांच्या संयमाची रोचक कथा

Updated: गुरूवार, 4 जून 2020 (17:24 IST)
 
त्या मुलाने त्याचे देखील दोन भाग केले आणि त्याची किंमत विचारली ? त्यांनी शांतपणे अडीच रुपये किंमत सांगितली. तो मुलगा तसेच साडीचे तुकडे करत गेला. शेवटी म्हणाला की आता मला ही साडी नको ही माझ्या काहीच कामाची नाही. हे तुकडे मला कसले कामाचे? 
 
विणकराने शांत पणे उत्तर दिले की बाळ ! हे तुकडे आता तर तुझाच काय अजून कोणाच्याही उपयोगी नाही. आता त्या मुलाला लाज वाटली तो म्हणाला की मी आपले नुकसान केले आहे. मी आपल्या त्या साडीची किंमत देतो.
 
विणकर म्हणाला की जेव्हा आपण साडी घेतलीच नाही तर त्याची किंमत मी आपल्याकडून कशी काय घेऊ ? 
 
त्या मुलाचा स्वाभिमान जागा झाला तो म्हणाला की मी फार श्रीमंत आहे. आपण गरीब आहात मी आपल्याला पैसे दिले तर मला काहीही हरकत नाही. पण आपण हे नुकसान कसं काय सहन कराल? आपले नुकसान मी केले आहेत. तर त्या झालेल्या नुकसानाची भरपाई तर मला करावीच लागणार.
 
विणकर म्हणाला की त्या झालेल्या नुकसानाची भरपाई आपण करू शकणारच नाही. विचार करा की शेतकऱ्याने यासाठी किती कष्ट घेतले आहेत मग कापूस लावला. माझ्या बायकोने खूप कष्ट घेऊन त्या कापसाला बनवून सूत विणले. मग मी त्याला रंगले आणि विणले. ही केलेली मेहनत त्यावेळी कामी आली असती जेव्हा त्या कापड्याला कोणी घातले असते. पण आपण तर त्या कापड्याचे फार तुकडे केले. आपल्या त्या पैशांनी हे झालेले नुकसान कसं काय भरून निघणार. 
 
विणकराचा आवाज रागाच्या ऐवजी शांतता आणि सौजन्यता होती. त्या मुलाला फार लाजिरवाणी गोष्ट वाटू लागले. त्याचे डोळे पाणावले. तो त्या विणकराच्या पाया पडला. विणकराने त्याचा पाठीवर मायेचा हात फिरवून त्याला आपल्या जवळ घेऊन म्हटले -
 
बाळ, मी जर का पैसे घेतले असते तर माझे काम झाले असते पण आपल्या आयुष्याचे पण त्या कापड्यासारखेच झाले असते. त्याचा काहीही उपयोग झाला नसता. एक साडी गेली तर मला दुसरी बनवता येऊ शकते पण जर का आपले आयुष्य अहंकाराने नष्ट झाले असते तर परत कसं काय मिळवणार ? आपण केलेले पश्चात्तापच माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
 
शिक्षा : संतांच्या उच्च विचारसरणीमुळे मुलाचे आयुष्य बदलले. हे संत अजून कोणी दुसरे नसून संत कबीर दासजी होय.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Homemade remedies: डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, नक्की करून पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

पावसाळ्यात तुमच्या हेल्मेटला दुर्गंधी येत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा

जातक कथा : ढोलवादक आणि जंगलातील दरोडेखोर

आषाढ महिन्यात 'आखाड तळणे' म्हणजे काय? वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments