suvichar

कंजूष जमीदार आणि हुशार श्याम

Updated: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (10:26 IST)
'ठीक आहे किती देणार आधी हे सांगा मगच मी उत्तर देतो 'असं श्याम म्हणाला.'
 
हे तर मी तुझे काम बघूनच ठरवेन जर तू चांगले काम केले तर वर्षांचे तुला बारा किलो तांदूळ देईन. जर काम चांगले केले नाही तर नऊ -दहा किलो देईन. कपडे देखील देईन. 'जमीदार म्हणाला.
 
त्याचे म्हणणे ऐकून श्याम म्हणाला - 'आता माझी देखील अट ऐकून घ्या. मला हे माहित आहे की आपण मजुरांना कमी खाणं आणि कमी मजुरी देता म्हणून ते काम सोडून जातात. आपण वर्षातून मला एक बियाणे धान्याचे द्या जे मी स्वतः जमिनीखाली पेरेन एक बियाणे गव्हाचे द्या ज्याला मी उंच जमिनीवर लावेन, घालायला कापडे द्या. दररोज एक पत्रावळी भात खाण्यासाठी द्या. एका पत्रावळीपेक्षा अधिक मागणार नाही. या नंतर पण मी काम केले नाही तर आपण माझे हात कापून टाका. पण या अट विरुद्ध आपण काम केले तर मी आपले हात कापेन, आपल्याला माझी अट मान्य आहे का ?
 
जमीदाराला काहीच हरकत नव्हती, त्याने श्यामची अट मान्य केली. श्याम ने मजुरी करण्यास सुरुवात केली. जेव्हा तो जेवायला गेला तेव्हा त्याने एक मोठे केळीचे पान नेले होते. 
 
जमीदाराने एवढे मोठे पान बघून रागावून श्यामला विचारले की तू केळीच्या पानात जेवणार आहेस? 
 
पण मालक अट आहे ना श्याम म्हणाला. होय अट अशीच होती. जमीदाराने उत्तर दिले. नंतर श्यामला केळीच्या पानात जेवायला दिले. श्याम दररोज केळीच्या पानातच जेवायचा. आचारीने देखील जमीदाराला सांगितले की मालक ह्या माणसामुळे भात शिजवून दमायला झाले हा एकटा 10 माणसांचा भात खातो कुठून आणले ह्याला.
 अरे पण हा 10 माणसांचे काम देखील एकटाच करतो जमीदार आचाऱ्याला म्हणाला.गोष्ट पण खरी होती की श्याम आपले सर्व काम मन लावून करीत असे. 
 
मजुरी म्हणून एक बियाणं गव्हाचं घेत होता. त्याने आपल्या मालकाला म्हटले -' मालक मी या शेणाच्या खाली गहू पेरले आहे.' धान्य जमिनीच्या खाली पेरले आहे. काही दिवसानंतर गव्हाच्या रोप्यातून बरीच धान्ये बाहेर आली आणि अशाच प्रकारे भाताच्या धान्यातून देखील बरीच धान्ये आली. 
 
श्यामने ते सर्व बियाणे म्हणून ठेवले. दुसऱ्या वर्षी देखील पीक चांगले आले. मजुरी म्हणून त्याला एक एक वेगळे बियाणे मिळाले. अटी प्रमाणे त्याला ते गहू आणि भात धान्य पेरायला खालची आणि वरची जमीन मिळाली. 
 
अशा प्रकारे जमीदाराच्या हातून सर्व जमीन निसटून गेली. श्याम ने खालच्या जमिनीत धान्य किंवा भाताची रोपे लावली आणि वरच्या जमिनीवर गहू पेरले. 
 
शेवटी जमीदाराने पंचांयतकडे श्यामची तक्रार केली. श्याम देखील तिथे हजर झाला. सर्व गावकऱ्यांनी श्यामला समजावले की जमीदाराला माफ कर त्याला त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.
 श्याम म्हणाला की 'ह्याने गरिबांना खूपच त्रास दिला आहे. त्यांना जेवायला देखील दिले नाही त्यांच्या कडून काम करवून घेतले ह्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. 
 
'ह्यांना थोडी जमीन देऊन दे' असे पंच म्हणाले. 'ठीक आहे ह्यांनी आपले हात कापून द्यावे 'श्याम म्हणाला.' नाही मी आपले हात कापणार नाही'. जमीदार म्हणाला.
 
 श्यामने जमीदारावर दया करून त्याला अर्धी जमीन परत दिली. त्या दिवसा पासून जमीदार देखील बदलला आणि तो सर्व मजुरांच्या सह चांगला व्यवहार करू लागला. त्यांना पोटभर जेवायला देत होता आणि योग्य मजुरी देखील द्यायचा. गावाचे लोक श्यामच्या हुशारीचे कौतुक करीत होते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

तेनालीराम कहाणी : गोष्ट जादुई पाण्याची

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अप्रतिम असणारी 'जांभूळ स्मूदी'; एक उत्तम हेल्थ ड्रिंक

Ghost Lashes Trend डोळ्यांच्या मेकअपचा बदलता ट्रेंड: घरच्या घरी कसा मिळवाल 'घोस्ट लैशेज' लुक?

Lokmanya Bal Gangadhar Tilak Jayanti Abhivadan 2026 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

फक्त ३० सेकंदात ओळखा, समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते का?

पुढील लेख
Show comments