Dharma Sangrah

करावे तसे भरावे

शुक्रवार, 4 जून 2021 (11:21 IST)
एकदा एका राज्याचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून घेतो.त्याच्या राज्यावरही ताबा घेतो. नंतर तो युद्धातून आणलेली सर्व  संपत्ती पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या राजमहालतील बागेत पुरून टाकतो. 
 
या युद्धात पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून तेथून पळ काढतो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.
 
या गोष्टीचा फायदा घेत राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि विजेत्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी राजाकडे येतात. विजेता राजा पराभूत राजकुमाराचे तेजस्वी आणि खान्दानी रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो. पाहुणा म्हणून त्याला राजेशाही वागणूक देतो.
 
तेथे राहून तो आपल्या बुद्धी आणि शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. संधी सापडताच तो राजवाड्याच्या आवारातील बागेत पुरलेलं ते  सारे  धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते त्याला खूप दु:ख होते.
 
तेव्हा त्याचा प्रधान म्हणतो महाराज आपण का दु:खी होता. जी संपत्ती आपली कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात. तेव्हा राजाला सत्य उमगते आणि तो दुखातून बाहेर पडतो. 
 
तात्पर्य - करावे तसे भरावे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या वॉर्डरोबमध्ये करा 'हे' ५ बदल; दिसा नेहमीपेक्षा स्टायलिश!

उन्हाळा संपताना 'हा' आजार वाढतोय; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे घरगुती उपाय

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

पुढील लेख
Show comments