Dharma Sangrah

आदित्य ठाकरे यांनी मनसेची उडवली खिल्ली, म्हणाले मनसे केवळ टाइमपास टोळी

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:40 IST)
मनसे ही केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका  पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मेथी कमी कालावधीत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक

हॉलंडच्या करिष्यमा मुळे नॉर्वेला आपला पहिला फिफा विश्वचषक बाद फेरीचा सामना जिंकला

महाराष्ट्राचे ११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आधुनिक तंत्रज्ञान यशाची खात्री देईल

ओप्पोच्या रेनो16 सिरीजच्या लॉन्चची तारीख जाहीर

एका रात्रीसाठी तब्बल २ लाख रुपये; मेकअप आर्टिस्टने केला मराठी अभिनेत्रीचा सौदा, हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

पुढील लेख
Show comments