Festival Posters

कोरोना योध्द्यांसाठी सुरू होणार समन्वय कक्ष

सोमवार, 12 एप्रिल 2021 (20:11 IST)
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत अहोरात्र अविरतपणे सेवा देणाऱ्या महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कोरोना योध्द्यांसाठी तातडीने 'कोव्हीड- 19 समन्वय कक्ष ' स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले आहेत. 
 
कोविडच्या या काळात महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचारी हे अविरतपणे ग्राहकांना आपली सेवा देतात.  सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटांत या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी  ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या आदेशानुसार,प्रत्येक परिमंडळ कार्यालयात ' कोव्हीड- 19 समन्वय कक्षा ' ची स्थापना करण्यात येणार आहे. 
 
गेल्या वर्षी कोरोनाचे भीषण संकट असूनही जीवाची पर्वा न बाळगता महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी राज्याला अखंडित वीज पुरवली. या काळात कोरोनाने जवळपास ६० कर्मचाऱ्यांचा जीवही गेला. यावर्षी कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना तातडीने मदत व उपचार मिळावे यासाठी डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत.
 
एखाद्या कर्मचाऱ्याला  कोरोनाचा संसर्ग झाल्यास तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी खाटा आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध व्हावी, तसेच या वीज कंपन्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, सोबतच विविध आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड- 19 समन्वय कक्षातून तातडीने मदत उपलब्ध केली जावे असे निर्देशही डॉ राऊत यांनी दिले आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

आता बॅरल आणि पिंपात इंधन भरण्यावर निर्बंध, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल खरेदीचे नवे नियम लागू

अधिक मास निमित्त जावयासाठी आणलेली सोन्याची अंगठी मांजरीने गिळली; अंगठी मिळाली पण निष्पाप प्राण्याचा जीव गेला

साखरपुड्याला जाताना कारची एसटी बसला जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे बोगस डॉक्टरकडून उपचार घेतल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

वर्ध्यात बनावट बियाणे आणि खतांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने ४२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले

पुढील लेख