संबंधित माहिती
- मंगळवारचा उपवास: या 8 कामाच्या गोष्टी जाणून घ्या
- Whatsappवर आता सहज एड करू शकता कॉन्टॅक्ट, येत आहे फीचर
- सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
- शाओमी मंगळवारी भारतात मी इलेक्ट्रिक स्क्रूड्रिव्हर लॉन्च करणार आहे
- नवतपा म्हणजे काय, त्यामुळे उष्णता का वाढते? जाणून घ्या
मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक, म्हणाले मग आमची परवानगी घ्यावी लागेल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, असे राज यांनी म्हटले आहे. भविष्यात परराज्यातील कामगारांना महाराष्ट्रात प्रवेश देताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे. तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, असे राज यांनी म्हटले आहे.#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct pic.twitter.com/cfWRKT8CiG
— Raj Thackeray (@RajThackeray) May 25, 2020
