मुंबईत १५ डब्यांच्या अधिक गाड्या धावणार
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देत मुंबईत १५ डब्यांच्या अधिक गाड्या चालवण्यास सांगितले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेतला आणि काही उपनगरीय स्थानकांची पाहणी केली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, बैठकीत क्षमता वाढ आणि अतिरिक्त रेल्वे सेवांद्वारे प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्यावर तसेच चालू प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यावर चर्चा झाली. मुंबईचे लोकल नेटवर्क सुधारण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत असे कुमार म्हणाले. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याच्या योजनेवर आधीच काम करत आहे. नवीन लोकल गाड्या सुरू करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि सोयीची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश कुमार यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना दिले. सीएसएमटी येथे झालेल्या आढावा बैठकीत मध्य रेल्वे (सीआर), पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी), रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आरएलडीए) आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Edited By- Dhanashri Naik