संबंधित माहिती
- हल्लेखोरांनी सोबत पेपर स्प्रे आणला होता, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
- महाराष्ट्रात दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान तीन जणांचा बुडून मृत्यू
- महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली, भुजबळ म्हणाले- मुंबई पोलिसांसाठी आव्हान
- वाय कॅटेगरीच्या सुरक्षेत बाबा सिद्दिकीची हत्या झाली, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
- बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली, म्हणाले-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: सलमान खानच्या घरी वाढवली सुरक्षा, सपा नेत्याने केले मोठे वक्तव्य
एनसीपी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून त्याच्या हत्येमुळे सुरक्षेचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच अभिनेता सलमान खानच्या घरी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच या घटनेनंतर सुरक्षेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत असून विरोधक शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहे. आता या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. हसन म्हणाले की, "बाबा सिद्दीकी हे एक प्रसिद्ध सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांची हत्या झाली असताना तेथे कोणीही सामान्य माणूस सुरक्षित आहे का? यावरून प्रशासनाची पूर्ण कोलमड दिसून येते.
तसेच बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून हत्येतील सर्व आरोपींचे लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहे.
Edited By- Dhanashri Naik
