शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (15:53 IST)

वीज कोसळून 14 जणांचा बळी

यावेळी, जिथे देशातील बहुतेक राज्यांमध्ये लोकांना उष्मा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी आसाममधील हवामानात अचानक बदल झाला आहे. काल रात्री येथील विविध भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या आसाम मध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून मृतांची संख्या 14 पर्यंत पोहोचली आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.  
 
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्याच्या गोलपारा, बारपेटा, दिब्रुगढ, कामरूप (मेट्रो), नलबारी जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाने उद्रेक केला.
 
वादळामुळे केवळ लोकांचा बळी गेला नाही तर घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि रस्त्यावर पडली आणि वीजवाहिन्या तुटल्या. एएसडीएमएच्या म्हणण्यानुसार, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.