बिहारमध्ये मोठा बदल, या शहराचे नाव बदलले
Bihar News: एक ऐतिहासिक निर्णय घेत, बिहार सरकारने गया शहराचे नाव बदलून 'गयाजी' केले आहे. या हालचालीमुळे शहराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखी वाढेल. या नावातील बदलामुळे केवळ स्थानिक ओळख वाढणार नाही तर प्रादेशिक विकासालाही हातभार लागेल.
मिळालेल्या माहितनुसार शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये राज्याच्या विकासाशी संबंधित योजना, कर्मचाऱ्यांचे फायदे आणि समाजकल्याण जाहीर करण्यात आले. या निर्णयांमुळे बिहारमधील नागरिकांना, शहीद कुटुंबांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आणि संधी मिळाल्या आहे. 'गया' शहराचे नाव बदलण्यापासून ते पाणीपुरवठा योजनांना आर्थिक मंजुरी देण्यापर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
गया शहर आता 'गयाजी' म्हणून ओळखले जाईल, स्थानिक संस्कृती आणि धार्मिक महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik