Dharma Sangrah

बैलगाडा शर्यती, याचिका घटनापीठाकडे

बुधवार, 13 डिसेंबर 2017 (10:52 IST)
राज्यातील बैलगाडा शर्यती बंद कराव्यात, अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण आता घटनापीठाकडे सोपवले आहे.
 

प्राणीप्रेमी संघटनांनी केलेल्या मागणीवरून राज्यातील बैलगाडा शर्यती बंद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने विस्तारित खंडपीठाकडे सोपवली असून, त्यावर आता आठ आठवड्यांनी निर्णय देण्यात येणार आहे. सांस्कृतिक हक्‍कांसाठी सरकारला कायदे करण्याचा अधिकार आहे किंवा नाही, याचा अभ्यास घटनापीठ करणार असून, तोपर्यंत राज्यातील बैलगाडा शर्यती बंद राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यातर्फे अ‍ॅड. सुहास कदम यांनी बाजू मांडली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments