सध्या वाढत्या संगणकीकरनाच्या युगात इ-मेलची आवश्यकता लक्षात घेवून हा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागानं घेतलाय. नेमका इ-मेल कसा लिहायचा याबाबत अनेक प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना पडायचे. त्यामुळेच पत्रलेखनाऐवजी ई-पत्र या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आलाय. याविषयी राज्यातील शिक्षकांची मत जाणून घेण्यात आली. काळाशी सुसंगत अशी पत्रलेखन पद्धती असावी यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.