Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे भाव पडले ऐकूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Updated: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (10:35 IST)
 
शेतकरी भेरूलाल मालवीय (40) हे मंदसौर कृषी समितीमध्ये आपला 27 क्विंटल कांदा विकण्यासाठी घेऊन आले. मात्र  कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
 यामध्ये भेरूलाल  मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगड तहसीलच्या उजागरिया गावचे रहिवासी आहेत. 27 क्विंटल कांद्याला 372 प्रतिक्विटल दराने फक्त 10,045 रुपये मिळाले. हाती आलेले पैसे घेऊन ते घरी निघाले होते. परंतु, त्यांना कृषी समितीच्या आवारात ह्रदयविकाराचा झटका आला आहे. भेरूलाल यांच्यासोबत त्यांचा मुलगा रवी सुद्धा आला होता. रवीच्या समोर त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भेरूलाल यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारने काही मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. कांद्याचा भाव हा प्रति 50 रुपये क्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments