Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन

Updated: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (11:35 IST)
 
मुनी तरुण सागर यांचे मूळ नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्य प्रदेशातील दमोह येथील गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव शांतीबाई आणि वडिलांचे नाव प्रतापचंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी ८ मार्च १९८१ रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली. त्यांच्या देश-विदेशातील अनुयायांची संख्या मोठी आहे. तरुण सागर हे त्यांच्या प्रखर आणि कडव्या विचारांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची काही वक्तव्ये वादग्रस्तही ठरली होती. मागील २० दिवसांपासून ते काविळीने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी उपचार थांबविले व संथारा व्रत घेण्याचा निर्णय घेतला. संथारा ही एक उपवासाची एक पद्धत असून यामध्ये मृत्यूचा पूर्वाभास होताच अन्न आणि पाण्याचा त्याग करतात. मृत्यूपर्यंत हा उपवास सुरू असतो. जैन धर्मात याला मोक्ष प्राप्तीची प्रक्रिया मानली जाते.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत जैन मुनी तरुण सागर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments