जुलै महिन्यात नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला होता. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या ‘महाआघाडी’तून बाहेर पडण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादेखील दिला. यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपशी युती केल्यानंतर नितीशकुमार एनडीएत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.