संबंधित माहिती
- शाळेतील शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षकाला अटक
- प्रेयसीची हत्या करून प्रियकराने मृतदेहाचे 50 तुकडे केले
- झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी शपथ
- महाराष्ट्र-झारखंडमध्ये रसभरी जिलेबी कोण चाखणार? दिल्ली भाजपच्या मुख्यालयात जिलेबी बनवायला सुरुवात
- भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू
भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू
Jharkhand News: झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला असून दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहे यामध्ये चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: रेशीम उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी होणार स्वावलंबी, महाराष्ट्र सरकारने केली योजना
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये मंगळवारी मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या साहिबगंजमध्ये दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. कोळशाने भरलेल्या मालगाडीने रिकाम्या मालगाडीला धडक दिली. या अपघातात दोन लोको पायलटसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ALSO READ: काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार
ही संपूर्ण घटना साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या फरक्का-लालमाटिया एमजीआर रेल्वे मार्गावर घडली. फरक्का येथून येणारी रिकामी मालगाडी बारहेत एमटी येथे उभी असताना लालमाटिया येथून कोळशाने भरलेल्या थ्रीपास मालगाडीने जोरदार धडक दिली. ही घटना पहाटे साडेतीन वाजताची आहे. या भीषण रेल्वे अपघातात दोन लोको पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या अपघातात चार ते पाच रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर सध्या सामुदायिक आरोग्य केंद्र, बारहेत येथे उपचार सुरू आहे.
ALSO READ: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार