suvichar

सगळे 'मोदी' लुटारू; सीताराम येचुरी यांचा दावा

मंगळवार, 13 मार्च 2018 (11:03 IST)
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून अनेक मोदींची नावे कानावर ऐकायला येत आहेत आणि हे सगळे मोदी लुटारू असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी येचुरी मुंबईत आले असून त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आदींचा संदर्भ देत येचुरी म्हणाले की, सरकारची साथ असल्याशिवाय हे लोक देश सोडून जाऊ शकत नाहीत. या लुटारूंना देश सोडून जाण्यासाठी सरकार मदत करते परंतु शेतकर्‍यांना मात्र कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिला जातो व शेतकरी आत्महत्या करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.
 
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक असून तसे झाले नाही तर शेतकरी जगणार नाही, आणि शेतकरी तगला नाही तर कुणीच जगणार नाही असे येचुरी म्हणाले. भारताचा कणा हा शेतकरी असून त्याच्याशिवाय देशाला भवितव्य नसेल असे सांगत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments