Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘तीन मूर्ती हैफा’चौक झाले तीन मूर्ती चौकाचे नाव

Updated: सोमवार, 15 जानेवारी 2018 (09:21 IST)
 
‘पहिल्या महायुद्धाच्या काळात इस्रायलमधील हैफा शहराच्या रक्षणासाठी भारतीय सैनिकांनी केलेल्या निस्वार्थ त्यागाचे आणि बलिदान दिले. भारतीयांच्या परंपरेला आपले वंदन आहे.’ असे पंतप्रधानांनी संदेश पुस्तिकेमध्ये लिहीले आहे. निस्वार्थी वृत्ती आणि बलिदानाच्या अध्यायाची काही पाने 100 वर्षांपूर्वी हैफामध्ये लिहीली गेली आहेत. त्याच्या शताब्दीनिमित्त तीन मूर्ती चौकाचे नामांतर केले जात आहे. या चौकाला “तीन मूर्ती हैफा’ असे नाव देण्याचा हा क्षण ऐतिहासिक आहे. या निमित्ताने हैफामध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली जात आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे आज 6 दिवसांसाठी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर नेतान्याहू यांचे स्वतः स्वागत केले. तीन मूर्ती चौकात उभारलेल्या ब्रॉंझच्या तीन मूर्ती या हैदराबाद, जोधपूर आणि म्हैसूरच्या लष्करी तुकड्यांचे प्रतिनिधीत्व करतात. स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी 15 इम्पेरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेड या सैन्य दलात या तीन सशस्त्र तुकड्या होत्या. या तुकड्यांनी महिल्या महायुद्धाच्या काळात 23 सप्टेंबर 1918 रोजी मजबूत हैफा शहरावर विजय मिळवला होता. ऑटोमन्स, जर्मनी आणि ऑस्ट्रीया, हंगेचीच्या संयुक्‍त फौजा या शहराच्या संरक्षणासाठी असताना या तीन तुकड्यांनी विजय मिळवलेल्या या लढाईचे अनेक पैलू प्रसिद्ध आहेत. हे शहर स्वतंत्र झाल्यामुळे मित्र राष्ट्रांच्या सेनेला सागरी मार्गाने रसद पोहोचवणे शक्‍य झाले होते. हैफा शहर स्वतंत्र करण्यासाठीच्या या युद्धामध्ये 44 भारतीय सैनिकांना हैतात्म्य प्राप्त झाले होते. आतापर्यंत 61 कॅव्हलरी (घोडदळ)च्यावतीने 19 सप्टेंबर हा स्थापना दिवस “फहैफा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments