Marathi Biodata Maker

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे

शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:48 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. गुरुवारी रात्री अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह दहा मंत्र्यांनी आपले राजीनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केले. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केला जाण्याची चर्चा आहे.

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दहा मंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी या आठही जणांनी आपले राजीनामे सादर केले. त्यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली, श्रम राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद, कृषिमंत्री राधामोहन सिंग, वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन, जलसंपदा व नदी विकासमंत्री उमा भारती, कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी, लघुउद्योग मंत्री, कलराज मिश्र यांचा समावेश होता. आठवे नाव मात्र गुलदस्त्यात आहे. याशिवाय मनुष्यबळ विकासमंत्री महेंद्र पांडे आणि कृषिराज्यमंत्री संजीवड बलियन यांनीही राजीनामा दिल्याचे समजते.  रुडी यांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी नाराज असल्यानेच त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे  बोलले जात आहे. तर दुसरीकडे उमा भारती यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments