संबंधित माहिती
- शिंदे गटातील आमदार म्हणतात, ‘पालकमंत्री बैठकीलाही बोलवत नाही’
- ‘सरकार पडेल असं म्हणणं म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न’
- गुजरातमध्ये उमेदवारी न मिळालेल्यांचा भाजपकडून सत्कार
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद काय आहे? यावर्षी कुस्तीच्या स्पर्धांवर प्रश्नचिन्ह का निर्माण झाले आहे?
- जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याच्या कारवाईत सामील पोलीस उपयुक्त विनय कुमार राठोड यांची बदली
औरंगाबाद : उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू
घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा अघटित घडू शकते. औरंगाबादच्या हसनाबाद येथे उकळत्या वरणात पडून 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगीराज नारायण आकोदे असे या मृत्युमखी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. योगीराज हा चिमुकला आपल्या आईसह खुलताबाद तालुक्यात सोबलगावंच्या प्रदीप जाटवे यांच्याकडे आला होता. घरात काही कार्यक्रम असल्याने पाहुणे आल्याने घरात स्वयंपाक सुरु असताना हा चिमुकला खेळत खेळत वरणाच्या भांड्याजवळ आला आणि त्याचा तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. या घटनेत योगीराज गंभीररीत्या भाजला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By - Priya Dixit
