Festival Posters

भंडारा भीषण अपघातात 8 ठार 13 जखमी

मंगळवार, 1 मे 2018 (08:56 IST)
जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना कंटेनरने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री 8च्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे 8 ठार तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत संताप व्यक्त केला आहे. यामुळे ताण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. सोमवारी सायंकाळी येथील विवाह सोहळ्यासाठी नागपूरचे हरगुडे कुटुंबातील वऱ्हाडी आले होते. लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी महामार्गाच्या कडेला उभे होते. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नवरदेवाच्या गाडीला धडक देत वऱ्हाड्यांना चिरडले. मृतकांमध्ये हिंगणघाट येथील एक दाम्पत्य आणि दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती ढासळल्याने नंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

₹15,000 पेक्षा कमी किमतीचा सर्वोत्तम फोन कोणता आहे? जाणून घ्या टॉप 5 5G स्मार्टफोन्स

मीरा आंद्रीवाने इतिहास रचला,पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले

National Work From Home Day 2026 नॅशनल वर्क फ्रॉम होम डे इतिहास, महत्त्व आणि संकल्पना जाणून घ्या

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा, शिरपूरमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले

कार थेट २० फूट खाली कोसळली! मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघलेल्या माय-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments