शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (23:55 IST)

भुजबळ यांनी त्यांच्या सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे

Bhujbal
ओबीसी समाजासाठी भाजपने १२ आमदारांचा त्याग केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करुन घेतली. ५ जिल्ह्यांच्या निवडणूका लागल्या तेव्हा सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार अशी घोषणा देखील केली. महाराष्ट्रात १ हजार ठिकाणी अटक करुन घेतली आहे. भुजबळ यांनी त्यांच्या सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपकडून ओबीसी जागर अभियान करण्यात येत असल्याचे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जर भुजबळ यांचे म्हणणे खरे आहे की, केंद्रान इम्पेरिकल डेटा द्यावा तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कशाला गेले होते. ते फडणवीस यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले की, आम्हाला पटतंय की ही राज्याची जबाबदारी आहे तर कसे कसे करुया संगा असे भुबळ यांनी फडणवीसांना विचारले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.