राज्यातील हवामान बदलत आहे, काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशाच्या वर गेलं आहे. तर भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतील हवामान ढगाळ असून काही ठिकाणी हलका पाऊस येत आहे. हवामान विभागाने मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.