Marathi Biodata Maker

बॅाशच्या ब्रेक वरील कामगार कामावर घेण्याचे न्यायालयाचे आदेश

बुधवार, 5 जानेवारी 2022 (09:05 IST)
बॅाशच्या गेल्या दोन महिन्यांपासून ब्रेक दिलेल्या टेंपररी कामगारांना औद्योगिक कामगार न्यायालयाने त्वरित कामावर घ्यावा असा अंतरिम आदेश दिला असल्याची माहिती एनईटीडब्लु कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली. या निर्णया बाबत उच्च न्यायालयात जाण्यासाठी कंपनीला २८ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आल्याचेही या पदाधिका-यांनी सांगितले. मान्यताप्राप्त यूनियन आमच्या विरुद्ध असल्याने, आम्ही आमच्या NETW कामगारांची यूनियन स्थापन केली व या संघटनेच्या माध्यमातूनच आम्ही संघर्ष सुरु केला. त्याला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयाबाबत सांगताने या पदाधिका-यांनी सांगितले की,  नामांकीत वकील टी. के. प्रभाकरण यांनी आमची न्यायालयात बाजू मांडली. या युक्तीवादानंतर  ३ जानेवारी २०२२ रोजी एक ऑर्डर न्यायालयाने दिली आहे. त्यात व्यवस्थापनाने कामगारांची Unfair Labour Practice जी चालवली आहे ती बंद करावी. ब्रेक /RLA (Red Light Activation) हे बेकायदेशीर आहे. या कामगारांना संपूर्ण पगार देण्यात यावा आणि कामावर बोलवण्यात यावे.
बॉश लि. सातपुर, नाशिक येथील जवळपास 711 NETW कामगारांना दिवाळीच्या तोंडावर कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटिस न देता २० ऑक्टोंबर २०२१ रोजी ब्रेक/RLA (Red Light Activation) ब्रेक दिला आणि त्यांना कामावर येण्यास बंदी घातली. या संदर्भात या कामगारांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे धाव घेतली. येथे कामगार उपायुक्त यांनी या कामगारांच्या बाजूने पत्र दिले. पण, व्यवस्थापनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments