Dharma Sangrah

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी

सोमवार, 17 जुलै 2017 (10:19 IST)

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांची आर्थिक उलाढाल दहा लाखांच्या वर आहे किंवा जे शेतीशिवाय अन्य नोकरी-धंदा करतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये तब्बल चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. या वेळी शेती आणि कर्जमाफीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी विस्ताराने उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना तयार करण्यात आली आहे. त्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

फ्रान्सच्या मायकल ओलिसेने पेले यांचा ५६ वर्षांहून जुना विक्रम मोडला, इंग्लंडच्या बेलिंगहॅमने मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी केली

गयानामध्ये ११६ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, ५३ जणांना वाचवण्यात यश आले

4 हजार वर्षांपूर्वीच्या राजकन्या युद्धकलेत पारंगत होत्या? ममींच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती

भूकंपामुळे नेपाळची भूमी हादरली, जाणून घ्या रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता

म्हात्रे यांच्यानंतर आता खंडणी प्रकरणात शिंदे शिवसेनेच्या एका महिला अधिकाऱ्यालाही अटक

पुढील लेख
Show comments