Dharma Sangrah

चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया

गुरूवार, 31 मे 2018 (17:21 IST)
’चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया’असा मंत्र घेऊन गनिमी कावा यास संघटनेने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिषदेत तज्ञांचं अनुभवकथन मार्गदर्शन आणि आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. ऊसाच्या शेतीने मोठ्या प्रमाणावर पाणी घेतले, घत आहेत. यावर कारखाने चालतात, राजकारणी गबर होतात मात्र ऊस उत्पादकाला फारसं काही मिळत नाही. यात अर्थकारण नव्हे तर राजकारण आहे असा स्पष्ट आरोप तज्ञ एचएम देसरडा यांनी केला.
 
पावसाचा स्वभाव बदललेला आहे. या एका वाक्यामुळे जलव्यवस्थापनावर काम करण्याची संधी मिळाली. पावसाचा आभ्यास केला पाहिजे. पावसाच्या पध्द्तीत झालेले बदल आणि जनसामान्यांच्या जिवनात झालेले परिणाम आत्मसात करणाची गरज आहे. असे प्रतिपादन भारतीय जल संस्कृती मंडळाचे आध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी केले.
 
डॉ. जनार्दन वाघमारे यांनी अण्णा हजारे यांच्या कामांचा हवाला देत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवायला हवा असे आवाहन केले. मराठवाड्याचे वाळवंट होणार असे अभ्यासक सांगतात. ही परिस्थिती येऊ असा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली. ही सुरुवात आहे. यापुढे गनिमी कावामार्फत सातत्याने विविध उपाय योजना केल्या जातील असे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, सुभाषराव जावळे, अवधूत चव्हाण, सुनिल साखरे, तुकाराम शेळके उपस्थित होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

World Environment Day 2026 Wishes in Marathi जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

LIVE: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर उमेदवार बाळ माने यांना पक्षातून काढून टाकले

भारताचे व्यापाराचे दरवाजे जगासाठी खुले आहे, मंत्री पीयूष गोयल म्हणाले- भारत जागतिक व्यावसायिक भागीदारीसाठी पूर्णपणे तयार आहे

श्रीलंकेतील वृद्धाश्रमात भीषण आग; ११ वृद्ध व्यक्तींचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

कोकण विधान परिषद निवडणुकीत गोंधळ उडाला; उद्धव ठाकरे यांनी बाळा माने यांना पक्षातून काढले?

पुढील लेख
Show comments