संबंधित माहिती
- शिवसेना पक्षाचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' निवडणूक आयोगाने गोठवलं
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून..-जयंत पाटील
- नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
- मी बाळासाहेबांचा मोठा नातू, त्या नात्याने जबाबदारी पार पाडत आहे
- सांगलीत गाडीने पेट घेतला, तरुणाचा होरपळून दुर्देवी मृत्यू
अहमदनगरात शॉक लागून चौघा भावांचा दुर्देवी मृत्यू
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात येठेवाडी येथे विजेच्या ताराला चिटकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार बर्डे असे या मयत चिमुकल्यांचे नावे आहेत. हे चौघे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. शाळा सुटल्यावर हे चौघे घरी गेले आणि घरा जवळ खेळात होते. दुपारी खंदरमाळवाडी गावातील वांदरकडा येथे छोट्या तळ्यात अंघोळीला गेले असता तळ्यावरील गेलेल्या वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून चौघांचा दुर्देवी अंत झाला. चिमुकल्यांचा मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By - Priya Dixit
