Festival Posters

लग्नावरून परतताना अपघातात चौघांचा मृत्यू

सोमवार, 27 मार्च 2023 (13:01 IST)
काळ कधी आणि कसा झडप घालेल हे कोणीही सांगू शकतं  नाही. लग्नसमारंभ म्हटले की सर्वत्र आनंदी वातावरण असते. मात्र कधी कधी या समारंभात गालबोट देखील लागते. नातेवाईकांच्या मुलाचे लग्न करून परत येताना अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पुण्याहून निलंगाचे बडूरकर कुटुंब नातेवाईकांकडे लग्नावरून गावी आपल्या वाहनाने निघाले. लग्नानंतर दोन वाहने निघाली असताना एकातनवरा नवरी होते तर दुसऱ्या वाहनांत व्हराडी होते .नवरा नवरी या अपघात सुखरूप असल्याचे समजले तर दुसऱ्या वाहनाचा अपघात गावी परत जात असताना औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुलाखाली पालटून झाला. या अपघात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अंश किरण बडूरकर, जय सचिन बडूरकर, अमर सचिन बडूरकर आणि प्रकाश कांबळे अशी मयतांची नावे आहेत. तर जान्हवी सचिन बडूरकर, यश किरण बडूरकर, गोदावरी सचिन बडूरकर आणि सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आजपासून सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली बदलली, नवीन नियमांविषयी जाणून घ्या

CBSE Re-evaluation: पोर्टल न उघडल्याने विद्यार्थी नाराज, मंडळाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments