Marathi Biodata Maker

गोंदियात 100 रुपयांसाठी मित्राची हत्या

सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:06 IST)
अवघ्या 100 रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली. हे दोन्ही मित्र मालवाहक ऑटो चालक होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. चिराग शेंडे (25 वर्ष) असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे (32 वर्ष) याला अटक केली आहे.
 
आरोपी विजय सहारे आणि मृत चिराग शेंडे हे दोघेही गोंदिया शहरातील महाराणा प्रताप चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मालवाहक गाड्यांचं ऑटो स्टँड आहे येथेच आपले मालवाहक ऑटो लावत असून दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दिवाळीत चिरागने विजयला 500 रुपये व्याजाने दिले होते. विजयने व्याजासह 560 रुपये चिरागला परत केले. मात्र व्याजाचे आणखी 100 रुपये देण्यासाठी चिरागने विजयकडे तगादा लावला होता.
 
पैसे देऊनही विजय त्रास देत असल्याने चिराग संतापला होता. शनिवारी सायंकाळी या दोघांमधील वाद विकोपाला गेला, त्यानंतर रागाच्या भरात विजयने आपल्या ऑटोतील लोखंडी सळई काढली आणि त्या सळईने चिरागच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात चिराग गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विजयने घटनास्थळावरुन पळ काढला.
 
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरवत फरार आरोपी विजय सहारे याला घटनेच्या दोन तासाच्या आत अटक केली.  

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

एकाच दुकानातून शोरमा खाल्ल्याने ५९ जण रुग्णालयात दाखल; भिवंडीत अन्न विषबाधेचा कहर

योगासाठी केवळ आसनेच नव्हे, तर आदर आणि कृतज्ञता यांचीही आवश्यकता असते; श्री श्री रविशंकर ध्यानाचा खरा मंत्र प्रकट करतात

कोलकाता विमानतळावर आगरतळ्याला जाणाऱ्या इंडिगो विमानावर वीज कोसळली

पुढील लेख
Show comments