1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. He never saw Maharashtra when he was the CM says Sujay Vikhe-Patil

मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत

ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे. 
 
दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRFच्या  निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
मी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांच्याशी बोललो -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे