1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (17:57 IST)

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर, 1 जूनपासून 76 जणांचा मृत्यू झाला असून 838 घरे उद्ध्वस्त झाली

rain
Maharashtra Flood News: महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला असून, राज्यातील अनेक भागात पुराच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनांची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार महाराष्ट्रात 1 जून 2022 पासून पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह गेल्या 24 तासांत 76 पैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि मुसळधार पावसामुळे 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पुनर्वसन विभागाकडूनही मदतकार्य सुरू असून 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 1 जून 2022 पासून महाराष्ट्रात पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमध्ये 125 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. त्याचवेळी मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्रातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तीन गावांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासात 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ते म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील आसना नदीच्या खालच्या भागात वसलेल्या हदगाव गावातील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी हिंगोली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून लोकांना बाहेर काढण्याचे आणि इतर प्रकारची मदत देण्याचे निर्देश दिले. हिंगोलीत गेल्या ४८ तासात मुसळधार पाऊस पडल्याने आसना नदीला पूर आला असून तिचे पाणी गावांमध्ये व शेतात शिरले आहे.