Maharashtra Marathi Breaking News Live Today: सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक गोविंद पानसरे यांच्या हत्येतील सहा आरोपींना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दीर्घ कारावासाच्या आधारे जामीन मंजूर केला.पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती.
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आहे. यासाठी काँग्रेसने प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला नवीन नारा तयार केला आहे आणि त्यावर आपला अढळ विश्वास दाखवला आहे.
सविस्तर वाचा
आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण रंगताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाबाबत अजित पवार कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत आणि आता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला आहे.
सविस्तर वाचा
मंगळवारी महाराष्ट्रातील लातूरमधील उदगीर येथील रामनगर भागात काही पोल्ट्री पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. पोल्ट्री पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्याने अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी, अधिकाऱ्यांनी संक्रमित पक्ष्यांना मारण्याचा आणि इतर सुरक्षा उपाय करण्याचा निर्णय घेतला.
सविस्तर वाचा
महाकुंभातील संगम येथे चेंगराचेंगरी
महाकुंभमेळ्यादरम्यान संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहे. आज, म्हणजे २९ जानेवारी रोजी, महाकुंभातील संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहे. कारण मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने यात्रेकरू आले होते. जखमींना कुंभ परिसरातील सेक्टर २ मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा
महाकुंभातील चेंगराचेंगरीत सध्या शेकडो लोक बेपत्ता आहे. त्याच वेळी, कुटुंबातील सदस्य हरवलेल्या आणि सापडलेल्या केंद्रांवर त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहे. या संदर्भात, केंद्रातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत २५०० तक्रारी आल्या आहे परंतु बहुतेक हरवलेल्या वस्तू सापडत आहे.
सविस्तर वाचा
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी प्रयागराजसह बनारस आणि अयोध्येत गर्दी नियंत्रणावरही चर्चा करत आहे.
सविस्तर वाचा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी मोठी गर्दी झाली आहे. आज, मौनी अमावस्येच्या निमित्ताने, १० कोटींहून अधिक भाविक महाकुंभात स्नान करतील अशी अपेक्षा आहे.
सविस्तर वाचा
महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर योगी सरकार सर्वांचे लक्ष्य बनले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील महाकुंभाच्या संगम नाकावर अचानक चेंगराचेंगरी झाली
सविस्तर वाचा
महाकुंभ मेळ्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षांकडून एक नवीन विधान आले आहे. सकाळी ११ वाजता तिन्ही शंकराचार्य एकत्र अमृत स्नान करतील. चेंगराचेंगरीनंतर यापूर्वी अमृत स्नान रद्द करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
सविस्तर वाचा
प्रयागराजमधील मौनी अमावस्येला होणारी गर्दी पाहता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आज प्रयागराज प्रदेशातील विविध स्थानकांवरून 360 हून अधिक गाड्या चालवण्याची योजना आखली आहे.
सविस्तर वाचा
बुधवारी मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभात संगम किनाऱ्याजवळ चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मौनी अमावस्येच्या स्नानापूर्वी पहाटे १ वाजता संगम नाक्यावर हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा
प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली आणि बॅरिकेड्सवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना काही भाविक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी बेंगळुरूमधील एका मदरशात शिकणाऱ्या 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पालकांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा
महाकुंभाच्या आयोजनादरम्यान ज्याची भीती होती ते अखेर घडले. महाकुंभात चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. यामागील कारण स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, ही भाजपची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे.
सविस्तर वाचा
देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, मंदिरातील भाविकांसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत लहान स्कर्ट आणि खुले कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता भारतीय पोशाख परिधान करून येणाऱ्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने (SGTT) नोटीस बजावली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील दौंड शहराच्या सीमेवर असलेल्या एका प्रसिद्ध इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला 100 रुपयांची सुपारी दिली. आणि त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यास सांगितले. हा सर्व प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा....
उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गोंधळाचे वातावरण आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि पीडितांप्रती शोक व्यक्त केला आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या गर्भात देखील गर्भ आढळले आहे. याला वैद्यकीय भाषेत ग़र्भाच्या आत गर्भ म्हणतात.ही अनोखी स्थिति आहे. या मध्ये विकृत गर्भ दुसऱ्या गर्भाच्या आत स्थित असतो. हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आहे. काही प्रकरणांमध्ये आढळून आले आहे.
सविस्तर वाचा....
मराठा आरक्षणाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पुन्हा जालन्यात उपोषणला बसले आहे.मराठा अरक्षणासोबतच सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या साठी ते उपोषणाला बसले आहे.त्यांच्या आज उपोषणाचा पांचवा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृति खालावली आहे. त्यांना सलाइन द्वारे उपचार दिले जात आहे. स्थानिक लोकांनी विनंती केल्यामुळे मनोज जरांगे यांनी सोमवारी रात्रि थोड़े पाणी प्यायले होते. मंगळवारी त्यांनी रात्री सलाइन द्वारे उपचार घेतले. आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक उपस्थित आहे
सविस्तर वाचा....
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी या प्रकरणात चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चेंगराचेंगरीबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा....
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अशोक धोडी 20 जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. धोडी शिंदे हे गटाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आहेत. धोडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याचा माग काढण्यात यश आलेले नाही.
सविस्तर वाचा....
ठाण्यातील एका मंदिरात अज्ञातांनी घुसून 31,000 रुपयांच्या चांदीच्या वस्तू चोरल्या. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.ठाण्यात पोलिसांनी 5.97 लाख रुपये किमतीचा 30 किलो गांजा जप्त केला.
सविस्तर वाचा
महाराष्ट्राचे मंत्री नितीश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा केंद्रात बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नये, कारण त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडू शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे. राणे म्हणाले, 'आमचे सरकार तुष्टीकरणाचे राजकारण खपवून घेणार नाही.
सविस्तर वाचा....
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्येनंतर टीकेला सामोरे जावे लागत आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
सविस्तर वाचा. ....
सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक गोविंद पानसरे यांच्या हत्येतील सहा आरोपींना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दीर्घ कारावासाच्या आधारे जामीन मंजूर केला.पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती.
सविस्तर वाचा. ....
भाजपपासून फारकत घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निम्म्याहून अधिक पक्ष, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे दररोज उद्धव यांना धक्के देत आहेत. मात्र असे असतानाही उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदे यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सविस्तर वाचा. ....