संबंधित माहिती
- आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही
- MPSC ने परीक्षापद्धतीत केलेले बदल 2025 पासून अंमलात येणार, काय आहेत हे बदल?
- शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा निकाल निवडणूक आयोग आज देणार?
- पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल, केशव उपाध्ये ट्विट
- त्यांना माणसांची पारखच नव्हती, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला
भाजपात आलो ही माझी अडचण -नारायण राणे
भाजपमध्ये सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून मी शांत आहे, भाजपात आलो ही माझी अडचण आहे, पण याचा कुणी फायदा घेऊ नका, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
यावेळी ते म्हणाले, "शिवसेना खरी वाढली ती कोकणातून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट केले आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यांनी साधी अंगणवाडीही कोकणात बांधली नाही. उलट कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला." ही बातमी ई-सकाळने दिली.
Published By- Priya Dixit
