1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (10:09 IST)

Nagpur :नवरदेवासह 80 वऱ्हाड्यांना अन्नातून विषबाधा, रिसॉर्ट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

नागपुरातील एका लग्न समारंभातील अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयास्पद प्रकरणात 80 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण नागपूर शहराच्या हद्दीत एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. 
 
ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली. वराच्या वडिलांनी रिसॉर्ट व्यवस्थापनावर कार्यक्रमादरम्यान शिळे जेवण दिल्याचा आरोप केला. तक्रारदार कैलाश बत्रा यांनी अमरावती रोड, नागपूरजवळील राजस्थानी थीम असलेल्या रिसॉर्टविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वराच्या वडिलांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी 9 आणि 10 डिसेंबरला दोन दिवसांसाठी नागपुरातील अमरावती रोडवरील राजस्थानी गाव-थीम असलेले रिसॉर्ट बुक केले होते.  
 
अन्न खाल्ल्यानंतर  10 डिसेंबर रोजी दुपारी त्रास सुरू झाला, जेव्हा वर आणि इतर पाहुण्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतर पोटदुखीची तक्रार केली. 80 जणांची प्रकृती खालावली.स्वागत समारंभात परिस्थिती आणखीनच बिकट झाली. प्रत्यक्षात रात्री दिल्या जाणाऱ्या जेवणातून दुर्गंधी येत असल्याने तक्रारदाराने रिसॉर्टच्या व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार केली, मात्र तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. 
 
मध्यरात्री 80 जणांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमलेश्वर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे जबाब नोंदवण्यास सांगितले असून, त्या आधारे रिसॉर्ट व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही रुग्णांवर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची प्रकृती खालावल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Edited by - Priya Dixit