Dharma Sangrah

नाशिकमध्ये भीषण अपघात: मद्यधुंद ट्रक चालकाने कारला धडक दिली, 4 ठार, 2 जखमी

शनिवार, 13 जुलै 2024 (17:40 IST)
शहरातील आडगावजवळ आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा यांच्यात धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा यांचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात नवीन सिडको परिसरातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर चालकाला समोरून येणाऱ्या ब्रेझा कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
 
ट्रकचा टायर फुटला
शुक्रवार, 13 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद चालक नाशिकहून आडगावकडे कोंबडी खत घेऊन जाणारा आयशर ट्रक चालवत होता. दरम्यान, ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक (एमएच 15 जीव्ही 9190) दुभाजकावर चढून थेट नाशिकच्या विरुद्ध दिशेच्या लेनवर गेला आणि त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने (एमएच 05 डीएच 9367) धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला.
 
ट्रक चालक व क्लिनर जखमी
आडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये प्रवास करणाऱ्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. रेहमान सुलेमान तांबोळी (वय 48), त्यांचा पुतण्या अरबाज चंदूभाई तांबोळी (वय 21), सिज्जू पठाण (वय 38, रा. इंदिरानगर), अक्षय जाधव (वय 24, रा. श्रद्धा विहार, इंदिरानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व लोक सटाणा येथे भाजी विकण्यासाठी गेले होते. तेथील व्यवसाय आटोपून ते नाशिकला घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, यलो अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

व्हॉट्सॲप एक उत्तम Birthday Reminder फीचर आणत आहे, बर्थडे रिमाइंडर लॉन्चची तारीख जाणून घ्या

जगन्नाथ पुरी रथयात्रेसाठी रिलायन्स फाऊंडेशनने सेवा मोहीम सुरु केली अन्न, पाणी आणि सुरक्षेवर भर

नितीन गडकरी म्हणाले – जर तुम्हाला ई२० नको असेल, तर १००% पेट्रोल खरेदी करा, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील

पुढील लेख
Show comments