संबंधित माहिती
- Nashik : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या
- नाशिक वणीच्या यात्रेत सुमारे 2000 किलो भेसळयुक्त पेढा जप्त; एफडीएची कारवाई
- नाशिक: मित्रानेच मित्राच्या घराला आग लावून कुटुंबीयांना मारण्याचा केला प्रयत्न
- राज्यात पुन्हा वाढला स्वाईनफ्लूचा धोका, नाशिकात एकाचा मृत्यू
- नाशिकात 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू
2 आणि 8 वर्षाच्या चिमुकल्यांना जीवे मारून आईने इमारतीवरून उडी मारली
नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. जिथे एका 30 वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजले आणि नंतर सकाळी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दोन्ही मुले आणि महिला यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कोणार्क नगरमध्ये पती आणि मुलांसोबत राहणाऱ्या 30 वर्षीय अश्विनी निकुंभ यांनी बुधवारी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. तर त्यांची दोन्ही मुले घरात मृतावस्थेत आढळून आली. अश्विनीने आत्महत्या करण्यापूर्वी मंगळवारी रात्री तिची मुले आराध्या (8) आणि अगस्त्य (2) यांना विष पाजल्याचा पोलिसांना संशय आहे.
बुधवारी सकाळी 7 वाजता शहरातील कोणार्कनगर भागातील आडगाव येथील हरि वंदन अपार्टमेंटच्या चार मजली घराच्या छतावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अश्विनीने एक व्हिडिओही बनवला आहे, ज्यामध्ये तिने या आत्महत्येसाठी पतीला जबाबदार धरले आहे.
पतीसोबत वारंवार होणाऱ्या भांडणामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं अश्विनीने कथित सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पतीने छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महिलेचा पती घरी नव्हता. ते कामानिमित्त पुण्याला गेले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
