संबंधित माहिती
- Nandurbar Accident : नंदुरबार मध्ये प्रवाशी बस पालटून भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू
- Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा नियुक्ती
- चंद्रकांत पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर
- एकनाथ शिंदे सरकारला भरावे लागणार 12 हजार कोटी, जाणून घ्या NGT ने का दिला असा निर्णय
- मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी
Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, 'या' भागात 'यलो अलर्ट '
राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
