कुठल्याच पिकाला अजूनही हमीभाव मिळत नाही आणि सरकार मात्र, तो वाढवून देण्याच्या गप्पा करतय , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये हमीभाव दीडपट करण्याची घोषणा केली मात्र गेली चार वर्षे त्याबद्दल सरकारने काहीच केले नाही कोणतेही पाऊल उचलले नाही. आमत्र आता निवडणुका समोर दिसू लागल्या असून त्यामुळे सरकारला शेतकºयांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुमारे ७३ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. भाजप सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करुन १ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असती, तर त्यातून शेतकºयांना काही दिलासा मिळाला असता असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.