1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 12 एप्रिल 2025 (11:23 IST)

महाराज त्यांना कधीही आशीर्वाद देणार नाही, अमित शहांच्या रायगड भेटीवर संजय राऊत यांचा टोला

sanjay raudh
Raigad News : गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. राऊत म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आशीर्वाद देणार नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राणा मुद्द्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशाचे गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर येत आहे. या भेटीबाबत शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दलही राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणतात की भाजप राणाला फाशी देण्याचे श्रेय घेऊ इच्छिते आणि निवडणुकीत त्याचा फायदा घेऊ इच्छिते.

अमित शहांच्या रायगड भेटीवर भाष्य
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अमित शहांच्या रायगड भेटीवर भाष्य केले. राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीही आशीर्वाद देणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मुंबई लुटायची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना छत्रपतींच्या चरणी स्थान मिळणार नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राऊत यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की अमित शाह कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठी येथे येत आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अजिबात शिल्लक नाही. देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे हे त्यांना आठवत नाही. राऊत म्हणाले की, मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिलांवर अत्याचार होत आहे. बलात्कार, खून आणि अपहरणाच्या घटना दररोज घडत आहे पण देवेंद्र फडणवीस राजकारण करण्यात व्यस्त आहे.