संबंधित माहिती
- Trimbakeshwar Jyotirling :12 ज्योर्तिलिंगापैकी एक नाशिकचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
- होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत
- Maharashtra Heatwave : अकोल्यात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद, कलम 144 लागू
- इयत्ता 10 वी चा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थी असे पाहू शकतील
- श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरी
अकोल्यात कलम 144 लागू , कारण जाणून घ्या
महाराष्ट्रातील अकोल्यात वाढता उष्मा आणि हवामान खात्याने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत अकोला जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरला असून, येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी शनिवार 25 मे ते 31 मे पर्यंत सीआरपीसी कलम 144 लागू केले आहे.
अकोला डीएम यांनी आस्थापनांना कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि पंख्यांची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करून दुपारच्या वेळेत ते आयोजित करू नयेत, असे निर्देशही त्यांनी दिले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भात असलेल्या अकोला येथे शुक्रवारी 24 मे 45.8 अंश सेल्सिअस तर शनिवारी25 मे 45.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात कमाल तापमान44 अंश सेल्सिअस ते 45.8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
Edited by - Priya Dixit
