शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (12:04 IST)

'मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते', शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजप संतप्त

Bhajp Adhyaksh
मणिपुर मधील परिस्थीचा उल्लेख करीत शरद पवार म्हणाले की, मणिपुर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होऊ शकते. ते म्हणाले की, दोन समाज जे वर्षांपासून सोबत राहत होते. त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. 
 
महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजनीति जलद झाली आहे. आता शरद पवारांनी असे वक्तव्य केले आहे की, ज्यावर हल्लाबोल सुरु आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या भविष्याची तुलना मणिपूर सोबत केली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मणिपुर सारखी परिस्थिती महाराष्ट्र मध्ये होऊ शकते. पवारांच्या या जबाबानंतर भाजपचा हल्लाबोल सुरु आहे.  
 
काय बोलले शरद पवार?
नवी मुंबईमधील एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान शरद पवार म्हणाले की, मणिपुर मध्ये एवढे सारे झाले पण पंतप्रधांना जाणीव झाली नाही की मणिपूरची परिस्थिती जाणून घ्यावी किंवा पाहून यावी. तेथील लोकांना दिलासा द्यावा. तसेच मणिपूरच्या आजूबाजूच्या राज्यात देखील ही परीस्थित आहे, कर्नाटक मध्ये देखील असे झाले. तसेच पवार पुढे म्हणाले की मला आता काळजी वाटते आहे की ही परस्तिथी महाराष्ट्राची देखील व्हायला नको.
 
राजनीतीची असा जबाब देऊ नका- बावनकुळे 
एनसीपी नेता शरद पवार यांच्यावर टोला लावत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार सारखे नेता हे म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये वायलेंस होईल, जातीय दंगे होतील. शरद पवारांनी राजनीतिसाठी या प्रकारचे वक्तव्य करू नये की महाराष्ट्रात दंगल होईल, वायलेंस होईल.