Dharma Sangrah

लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला आहे - सुप्रिया सुळे

दिवसेंदिवस राज्यात छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका लहान मुलाची हत्या करण्यात आली. लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला असल्यामुळेच अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केले. जागर युवा संवाद यात्रेनिमित्त इस्लामपूर येथे असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
 
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की पूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना फार कमी ऐकायला मिळायच्या. आज रोज अशा घटना ऐकायला मिळतात. मुलांसाठी शाळांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. समाज म्हणून हे आपले अपयश आहे. आपण सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. सरकारच्या कारभारावर टीका करत सुळे म्हणाल्या की सरकारचा विकासाचा एजेंडा बाजूला राहिला आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत हे सरकार वेगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. या सरकारच्या पारदर्शकतेचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ऐन दिवाळीत या सरकारने गरीबांच्या तोंडची साखर पळवली. या सरकारच्या काळात सर्वच घटक निराश आहे अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

गावठी दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले, मृतांचा आकडा १८ वर; ५ जणांची प्रकृती अद्याप गंभीर

अमरावती विधान परिषद निवडणूक: प्रवीण पोते यांचे नामांकन स्थगित

पुणे विषारी दारूकांड प्रकरणात ९ पोलीस अधिकारी निलंबित

LIVE:अमरावती विधान परिषद निवडणूक प्रवीण पोते यांचे नामांकन स्थगित

पुढील लेख
Show comments