संबंधित माहिती
- अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, गृहमंत्रालयाने दिली परवानगी
- आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून
- जेईई, नीट २०२० ची परीक्षा अेता सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल
- सीएची परीक्षा घेता येण कठीण आहे, इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटण्टस ऑफ इंडियाची माहिती
- रुग्णवाहिका, खासगी वाहने जिल्हा प्रशासन अधिग्रहीत करणार
परिक्षा घेणार नाही यावर राज्य सरकार ठाम
युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा होतील असा निर्णय दिला होता. मात्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांना पत्र लिहून परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे पत्राद्वारे कळवले. विद्यार्थ्यांना जास्तीचे ग्रेड मिळवण्यासाठी परिक्षा ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचेही या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
उदय सामंत म्हणाले की, “देशातील मोठ्या आयआयटी संस्थांनी अंतिम वर्षाची अंतिम परिक्षा रद्द केली आहे. तसेच देशातील इतर राज्यांनी देखील वेगवेगळी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे युजीसीने घेतलेला निर्णय हा बंधनकारक नसून ते केवळ एक सूचना आहे.”
